बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील आगीची सीआयडीच्या माध्यमातुन चौकशी करावी – आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर: आशिया खंडातील सर्वात मोठा बांबु विषयक प्रकल्प असलेल्या चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या काही इमारतींना लागलेली आग ही अतिशय दुर्देवी घटना असून या घटनेची चौकशी सीआयडीच्या माध्यमातुन करण्याची मागणी माजी अर्थ व वनमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा...
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा
चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी : कोरोना पॉझेटिव्ह अहवाल येणाऱ्या बाधीत रूग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेवून त्यांच्या तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज कोरोना टास्क समितीच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आयोजित कोरोना...
एका बाधिताच्या मृत्यू सह 42 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात चार जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 42 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार...
ग्रामीण भागात ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही
मुंबई, दि.२५ : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि...
चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग
चंद्रपूर:जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात भीषण आग लागल्याची माहिती पुढे येत आहेत.आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.आज 25 फेब्रुवारीला दुपारी अचानकपणे लागलेल्या या आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.
‘ब्रांडिंग’साठी चंद्रपूर मनपाने काढलेल्या ‘त्या’ निविदेवर नगरसेवक पप्पू देशमुख यांचा आक्षेप
चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेने स्वतःच्या प्रसिध्दी(ब्रॅडिंग) करिता वर्षाला २५ ते ३० लक्ष रुपये खर्चाची निविदा काढली.कोरोना आपत्तीमुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट झालेली असल्यामुळे मनपाने अनेक खर्चामध्ये कपात केलेली आहे.कोरोनाच्या आपत्तीचा सामना करतांना मोठा निधी खर्च झाल्यामुळे विकास कामासाठी...
जीएसटी कायद्यातील तुघलकी तरतुदी रद्द करावेत
चंद्रपूर: जीएसटी कायद्यातील वारंवार होणारे बदल थांबवावेत, जीएसटी परताव्यात सुधारणा करण्याची अनुमती द्यावी, सतत बदलांच्या अध्यादेशाचा मारा थांबवावा, नोंदणी रद्द करण्याची किंवा प्रतिबंधित करण्याचे अधिकारांचे उल्लंघन थांबवावे, जर पुरवठादाराने GST भरला नाही तर त्याची जबाबदारी खरेदीदारावर टाकली जात आहे...