चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू

चंद्रपूर १३ जुलै – रहमत नगर येथे पाणी साचल्याने खबरदारी म्हणून परीसरातील २५ घरातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरीकांना आणण्यात आले असुन इतर नागरीकांनाही आणण्याची मोहीम सुरु आहे.
इरई धरणाचे सातही दरवाजे १.० मीटरने उघडण्यात आल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन रहमत नगर परीसरातील नागरीकांच्या घरात पाण्याचा शिरकाव सुरु झाला. परिस्थितीवर लक्ष ठेऊन असणाऱ्या महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने बचाव कार्य सुरु करून नागरीकांना सुरक्षित स्थळी आणले गेले आहे. येथे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा मनपामार्फत पुरविण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here