कोविडमुळे अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली

चंद्रपूर: कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे हे एक मोठे आव्हान आहे. भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर भूकंपातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षात एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे.

अशा विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी देश पातळीवरील वरिष्ठ मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने व पुण्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञांच्या सहाय्याने संशोधनावर आधारित उपचार करून त्याचे रिपोर्ट्स बनविण्यात आले आहेत. देशातील हा सर्वात मोठा प्रयोग आहे. याचा फायदा कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल याची संस्थेला खात्री आहे. भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटतील. त्या जिल्ह्यातील कोविडमुळे आई व वडिलांचे छत्र हरपलेल्या व ५ वी ते १२ वी पर्यंत मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ
यादी घेतील. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतील.

बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नास्ता, भोजन, खेल, अधिकथा अभ्यास, दवाखाना, मानसोपचार तज्ञांचा सल्ला विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध आहे.

भारतीय जैन संघटना मागील ३० वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रामध्ये अविरत कार्य करीत आहे. कोविडमध्ये सुद्धा मार्च २०२० पासून मोबाईल डिस्पेन्सरी सेवा, मिशन झिरो प्लाइमा डोनर्स जीवनदाता योजना, रक्तदान चळवळ, मेरो सलंस कोविट केअर सेंटर्स, मिशन लसीकरण, मिशन ऑक्सिजन बैंक व मिशन राहत या उपक्रमांच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढा देत आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने १९९३ सालापासून आजपर्यंत या संकुलात वेगवेगळ्या आपत्तीमध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सहकार्य केले आहे. यावेळीही राज्य शासनाचे सहकार्य आम्हास लाभत आहे याबद्दल शासनाचे आभार.

दिनांक २१ जुन २०२१ रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना कोविडमुळे अनाथ झालेल्या मुला मुलींचे इयत्ता वर्ग ५ ते १२ वी पर्यंत शैक्षणिक पुर्नवसनसाठी चंद्रपूर जिल्हा मध्ये जे काही मुल किंवा मुली असेल त्यासाठी त्यांची यादी आणि जिल्हा प्रशासन संपूर्ण सहकार्य दिल्यासाठी निवेदन देत आहो. यावेळी विभागीय संपर्क विदर्भ ईस्ट चे अशोक संघवी, विदर्भ कार्यकारणी सदस्य प्रशांत वैद, जिल्हा अध्यक्ष गौतम कोठारी, जिल्हा सचिव अनिल बोथरा, शहर अध्यक्ष द्वीपेंद्र पारेख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ने पूर्ण सहकार्य करू व CWC च्या अधिकारीला निर्देष दिले. त्याबद्दल जिल्हा अध्यक्ष गौतम कोठारी यांनी त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here