
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे. लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील का? लॉकडाऊन उठवण्याची घोषणा करतील का? जिल्हाबंदी उठवतील का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे रात्री 8.30 ला मिळतील.