चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1071 झाले कोरोनामुक्त ; जाणून घ्या आजची सविस्तर आकडेवारी

चंद्रपूर, दि.22 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1071 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 377 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 17 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 600 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 72 हजार 998 झाली आहे. सध्या
6 हजार 246 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 53 हजार 98 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 69 हजार 881 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 42 वर्षीय महिला, घुटकाळा वार्ड येथील 54 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 38 वर्षीय पुरुष, पंचशील चौक परिसरातील 60 वर्षीय महिला, पठाणपुरा वार्ड परिसरातील 52 वर्षीय महिला, नेहरू नगर परिसरातील 55 वर्षीय पुरुष, यशवंत नगर परिसरातील 50 वर्षीय महिला.
बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड येथील 68 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष.
राजुरा तालुक्यातील सोनुर्ली येथील 50 वर्षीय पुरुष.
भद्रावती तालुक्यातील शेगाव येथील 47 वर्षीय महिला, 54 वर्षीय पुरुष. कढोली येथील 65 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष तर तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1356 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1257, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 45, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 377 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 103, चंद्रपूर तालुका 26, बल्लारपूर 49, भद्रावती 33, ब्रम्हपुरी 23, नागभिड 12, सिंदेवाही 14, मूल 08, सावली 06, पोंभूर्णा 05, गोंडपिपरी 06, राजूरा 28, चिमूर 09, वरोरा 17, कोरपना 28, जिवती 08 व इतर ठिकाणच्या 02 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here