कोरोना विस्फोट!चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात तब्बल 1584 नवे रुग्ण, 25 बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 18 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 547 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1584 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 25 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 42 हजार 231 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 30 हजार 650 झाली आहे. सध्या 10 हजार 981 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 29 हजार 846 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 80 हजार 149 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या तुकुम येथील 47 वर्षीय व 63 वर्षीय पुरुष, दाताळा येथील 58 वर्षीय महिला, गंज वार्ड येथील 68 वर्षीय पुरुष, बियाणी नगर येथील 52 वर्षीय महिला, इंदिरानगर येथील 65 वर्षीय महिला, सिद्धार्थ वार्ड वरोरा येथील 62 वर्षीय पुरुष, बागदेवाडी भद्रावती येथील 50 वर्षीय पुरुष, घोडपेठ भद्रावती येथील 70 वर्षीय पुरुष, नागभीड येथील 52 वर्षीय महिला, तळोधी नागभिड येथील 53 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 60 वर्षीय महिला, चिमूर येथील 83 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 55 व 37 वर्षीय पुरुष, चननखेडा भद्रावती येथील 75 वर्षीय पुरुष, झाडे प्लॉट भद्रावती येथील 70 वर्षीय पुरुष, लाखांदूर भंडारा येथील 40 वर्षीय महिला, वडाला पायखू ता. चिमूर येथील 72 वर्षीय महिला, गोंडसावरी चिचपल्ली येथील 35 वर्षीय महिला, नागभिड येथील 82 वर्षीय पुरुष, लोन वाही तालुका सिंदेवाही येथील 51वर्षीय महिला, तपाल ता. ब्रह्मपुरी येथील 30 वर्षीय पुरुष, बोंडेगाव ब्रह्मपुरी येथील 42 वर्षीय पुरुष, वार्ड नंबर 15, मुल येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 600 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 551, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा दोन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 1584 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 495, चंद्रपूर तालुका 67, बल्लारपूर 96, भद्रावती 124, ब्रम्हपुरी 240, नागभिड 27, सिंदेवाही 17, मूल 55, सावली 22, पोंभूर्णा 5, गोंडपिपरी 7, राजूरा 61, चिमूर 173, वरोरा 140, कोरपना 28, जीवती 5 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here