

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं राज्यातील जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.