दोन बाधितांच्या मृत्यू सह 245 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 25 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 245 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 489 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 417 झाली आहे. सध्या 1657 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 63 हजार 94 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 30 हजार 412 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील जयराज नगर येथील 83 वर्षीय पुरूष व वाल्मिक नगर येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 415 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 376, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 245 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 74, चंद्रपूर तालुका 23, बल्लारपूर 12, भद्रावती 18, ब्रम्हपुरी दोन, नागभिड पाच, सिंदेवाही पाच, मूल सहा, सावली सहा, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी तीन, राजूरा सात, चिमूर 13, वरोरा 46, कोरपना 19, जिवती एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here