24 तासात 55 नव्याने पॉझिटिव्ह,25 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 25 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 55 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 874 झाली आहे. सध्या 166 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 10 हजार 511 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 85 हजार 250 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 397 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 359, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 55 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 20, बल्लारपूर चार, भद्रावती आठ, मुल तीन, सावली दोन, राजुरा दोन, चिमुर चार, वरोरा 10 व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here