चार बाधितांच्या मृत्यू सह 97 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 18 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 97 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून चार कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 718 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 626 झाली आहे. सध्या 747 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 63 हजार 580 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 39 हजार 757 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये पालेझरी ता. जिवती येथील 33 वर्षीय पुरूष, बामणी ता. बल्लारशा येथील 74 वर्षीय पुरूष, कुकवाडा ता. भद्रावती येथील 52 वर्षीय पुरूष व आमराई वार्ड ता. घुग्गुस येथील 63 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 345 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 318, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 97 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 31, चंद्रपूर तालुक्यातील सहा, बल्लारपुर चार, भद्रावती 12, नागभीड दोन, सिंदेवाही सहा, मूल पाच, सावली दोन, गोंडपीपरी आठ,राजूरा आठ, चिमुर तीन, वरोरा चार, कोरपना दोन, जीवती एक व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here